केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान मुंबईत बँका आणि राज्य ग्रामीण उपजीविका अभियानांसोबतच्या उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवणार
ग्रामीण विकास मंत्रालय दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान राबवत आहे. ग्रामीण भागात समुदाय-आधारित संस्था उभारणे आणि त्यांना शाश्वत उपजीविकेशी जोडणे, हा भारत सरकारच्या प्रमुख कार्यक्रमांपैकी एक आहे. गेल्या दीड दशकात या अभियानाने 10 कोटींहून अधिक ग्रामीण महिलांना 93 लाखांहून अधिक स्वयंसहायता गट (एस एच जी) आणि त्यांच्या महासंघांमध्ये संघटित केले आहे. या प्रवासात बँकिंग क्षेत्र एक प्रमुख भागीदार राहिले आहे, ज्याने सातत्यपूर्ण उच्च परतफेडीच्या शिस्तीच्या जोरावर स्वयंसहायता गटांना 13.67 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त एकत्रित कर्ज वितरित केले आहे. संस्थात्मक कर्जाच्या भक्कम प्रवाहामुळे स्वयंसहायता गटांच्या सदस्यांना उपजीविकेचे उद्योग मोठ्या संख्येने स्थापन करून त्यांचा विस्तार करणे शक्य झाले आहे आणि यातून 3.46 कोटी महिला 'लखपती दीदी' म्हणून उदयास आल्या आहेत. यापैकी अनेक उद्योग विकासाच्या टप्प्यात प्रवेश करत असताना तसेच नवीन उपक्रम उदयास येत असताना, महिला-नेतृत्वाखालील उद्योगांचे संगोपन करणे, त्यांच्यासाठी वित्तपुरवठा मिळवणे अधिक सुलभ करणे आणि शाश्वत ग्रामीण व्यवसायां...