आंतरराष्ट्रीय अर्बोरीकल्चर परिषदेतील शिफारसी केंद्र आणि राज्य सरकारला सादर करणार
मुंबई, २७ फेब्रुवारी २०२६: "शहरी वृक्षांचे शास्त्रीय पद्धतीने संवर्धन करण्याचे शास्त्र सांगणाऱ्या अर्बोरीकल्चर परिषदेतील विचार मंथनाच्या शिफारसी धोरण निश्चित करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला पाठवण्यात येणार असल्याची माहिती नानाजी देशमुख प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पांडे आणि ATCA चे संचालक वैभव राजे यांनी दिली." मुंबईतील हॉटेल सहारा स्टार, विले पार्ले (पूर्व) येथे दिनांक ६ मार्च ते ८ मार्च २०२६ दरम्यान दुसरी आंतरराष्ट्रीय अर्बोरीकल्चर (वृक्ष संवर्धन) परिषद आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शहर नियोजनातील मान्यवर आणि जगभरातील अर्बोरीकल्चर तज्ञ या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. वृक्ष संवर्धन हा काळाची गरज या परिषदेची पत्रकार परिषदेत माहिती देताना नानाजी देशमुख प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पांडे म्हणाले, "शहरांमध्ये वृक्ष लागवडी बरोबरच अस्तित्वात असलेली झाडे संवर्धित करणे काळाची गरज आहे. शहरी विकासाला हिरवी झालर देताना अर्बोरीकल्चरचे शास्त्रीय तंत्रज्ञान या परिषदेच्या माध्यमातून धोरणापर्यंत पोहोचणार...